मनाची कविता

1 comments

मी हरलो म्हणू नकोस

यावेळी हरलोय म्हण

पुन्हा जग जिंकण्यासाठी

येतील कितीतरी क्षण

एकटा उरलो म्हणू नकोस

सध्या एकटा आहे म्हण

आयुष्य संपले नाही अजून

भेटतील किती तरी जण

मी थकलो म्हणू नकोस

जरा दम घेतोय म्हण

पुन्हा झेप घेण्यासाठी

पेटून उठेल एकेक कण

तुषार जोशी, नागपूर

If you like this post, please share it!
Digg it StumbleUpon del.icio.us Google Yahoo! reddit

1 Response to मनाची कविता

September 6, 2010 at 7:48 AM

Wow! Mast aahe

Post a Comment